१२ जुलै, २०१६

इस्लामी दहशत वाद आणि भारतीय सेक्युलारीझम समोरील आव्हाने

होय इस्लाम खरोखरच खतरेमे आला आहे .


बांग्ला देशात इस्लामिस्टांनि २० लोक ठार केले . आधी त्यांचे धर्म विचारले , मग त्यांना कुराणातील आयती  म्हणून दाखवायला सांगितले . ज्यांना जमले नाही त्यांचे गेले चिरले . नुकताच एक काश्मिरी दहशत वादी मारला गेल्यावर हजारोंचे मोर्चे निघाले . कन्हैया कुमार कंपूतला उमर खालिद अतिरेक्यांना बाप बोलता झाला . 

या आधी पेरिस च्या 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मुहम्मद पैगंबर आणि इसीस च्या नेत्याची व्यंगचित्रे छापली म्हणुन कडव्या इस्लामिस्टांनि एक डझन लोकांना गोळ्या घालून ठार केले आहे. यावेळी ते अल्लाहू अकबर , आम्ही प्रेषित अपमानाचा सूड घेतला आणि धर्म्ररक्षण केले अशा अर्थाच्या घोषणा देत होते. यामुळे त्यांचा धर्म टिकेल, वाढेल आणि इस्लामला सन्मान मिळेल असे त्यांना वाटते .
वास्तवात जगभरात आधीच अस्तित्वात असलेल्या इस्लाम विरोधाला आता अजून धार येणार आहे .  

 विवेकवाद आणि सहिष्णुता यांच्याशी इस्लाम धर्माचे काहीही देणे घेणे नाही. मुळात इण्टोलरन्स आणि इतर विचाराशी / धर्माशी असहिष्णुता हा कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांचा गाभा आहे . सर्वच धर्म मनुष्यकृत आहेत . मानवाच्या रानटी अवस्थेत धर्माची निर्मिती झाली असल्याने सर्वच जुन्या धर्मात थोडाबहुत रानटीपणा आढळतोच . इस्लाम मध्ये हे प्रमाण जास्त आहे कारण अरबांचा वाळवंटि प्रदेश , टोळीयुद्ध , सततचा कोरडा दुष्काळ  , वाळवंटि दुर्भिक्ष या सार्या घटकांचा परिणाम इस्लाम वर झाला आहे . त्याहून वाइट म्हणजे इस्लाम मध्ये धर्म सुधारणा चळवळीची वानवा आहे . मुद्दा असा कि या सार्याचा इस्लामला काहीही उपयोग होताना दिसत नाही . इस्लामची म्रुत्युघंटा वाजू लागली आहे .

सुबुद्ध आणि सुसंस्क्रुत मुस्लीमाला या इसीसशी किंवा अल कायदाशी माझा संबंध नाही असे म्हणणे आवश्यक ठरणार आहे . पण त्यातून सुधारणा चळवळ जन्म घेताना दिसत नाही याउलट "खरा" इस्लाम शांतता प्रिय आहे वगैरे अकलेचे तारे तोडले जातात . इस्लामचे असहिष्णू रूप कुराण आणि हदीसच्या पाना पानावर आहे. सत्य फार काळ लपत नसते . इस्लाम सुधारणा घडवू शकत नसल्यास तो संपणार आहे. जो वाकत नाही तो मोडतो . नव्या आधुनिक जगाशी ज्याना जुळवून घेता येणार नाही त्या सर्वच धर्मांची हि हालत होणार आहे .
 



सेक्युलारीझम का हरतो ?


दहशत वादी   हल्ल्यानंतर भारतीय सेक्युलरांच्या प्रतिक्रिया पहाण्याजोग्या आहेत . एकिकडे दहशतवादाचा निषेध आणि दुसरीकडे  अमेरिका चुक्या - भारत तुम्हाराभी चुक्याच   ! असा अर्थ सेक्युलर प्रतिक्रियांच्या लसावितून निघतो …  

इस्लाम चिकित्सा नावाचा प्रकार भारतीय पुरोगामी हुंगत सुद्धा नाहीत . मुसलमानांनी दहशतवादी हल्ले केले की अमेरिकेला शिव्या दे भारत सरकारला शिव्या दे वाढीव म्हणून ज्यूनाच शिव्या दे - अशी बौद्धिक कसरत ते करतात !

मुस्लिम दहशत वादाचा संघ फायदा घेतो की काय ? या फालतू मानसिकतेतून जन्मलेली ही पुरोगामी तर्कटे आहेत. पुरोगाम्यांच्या इस्लामिक चाटूगिरीमुळे संघ फोफावला - संघाच्या वाढीला सर्वस्वी जवाबदार म्हणजे भ्याड पुरोगामी होत. हिंदू समाज बदलून गेला . पुरोगाम्यांची बौध्दिवाद गेल्या साठ वर्षात झालीच नाही . आणि त्याचेच हे परिणाम आहेत.  या कथित सेक्युलर पुरोगाम्यांकडे पिजर्यातील विनोदी माकडासारखे हिंदू समाज पाहतो .
भारतातल्या स्वत:ला सेक्युलर म्हणणार्यांनि इस्लाम धर्म रक्षणाचि भूमिका घ्यावी यात काहीच धक्कादायक नाही . आजवरचा इतिहास पाहता ,जमाते इस्लामी आणि भारतीय सेक्युलर यांच्या भूमिकात विलक्षण साम्य आहे . साम्यवादी विचारवंतांचे भारतीय बौद्धिक जगतावर साम्राज्य आहे .त्यातून हा   विचार  जन्मला आहे .. इस्लाम हा धर्म इथल्या वर्ण व्यवस्थेतून मुक्ती देणारा समतावादी धर्म आहे अशी जमाते इस्लामीची मांडणी आहे . सार्या भारताने इस्लाम स्वीकारून समतेच्या धर्मात सामील व्हावे यासाठी जमाते इस्लामी ने इस्लाम सर्वांसाठी असे अभियान चालवले आहे . भारतीय सेक्युलर या अभियानात जाणता / अजाणता सामील आहेत .
मुळात इस्लाम हा भारतीय धर्म नसल्याने त्यात वर्ण व्यवस्थेचे समर्थन नाही . वर्ण व्यवस्था वाइटच ... पण वर्ण व्यवस्थेचे समर्थन नसणे हा समतेचा एकमेव क्रायटेरिया आहे काय ? सर्व धर्म मानवनिर्मित आहेत . भारतातले धर्म इथल्या सामजिक गोष्टीवर भाष्य करतील … अरबी धर्म कसे करतील ?

इस्लाम मध्ये समता आहे हा साफ खोटा प्रचार आहे . तत्कालीन अरबांचि स्त्रियांकडे पाहण्याची                   " विशिष्ट "  दृष्टी इस्लाम मध्ये ओतप्रोत भरली आहे . बहुपत्नीत्व तलाक बुरखा या केवळ रूढी नाहीत .       " स्त्रिया म्हणजे पुरुषांची शेती " अशी वाक्ये कुराणातून अल्लाहनेच लिहून ठेवली आहेत . कुराणात गुलामांना चांगले वागवा असे उल्लेख येतात . गुलामगिरी प्रथा नष्ट करा असे कुराण म्हणत नाही . आजही मुस्लिम राष्ट्रात गुलामगिरी आहेच . चातुवर्ण नसले तरी विषमता विषमता असू शकतेच . काफिर आणि मोमीन अशी सार्या जगाचीच दोन भागात विभागणी करणारा इस्लाम हा समतावादी किंवा शांतता प्रिय धर्म आहे असे म्हणण्याचे धाडस फक्त भारतातले सेक्युलर आणि जमाते इस्लामीच करू शकतात . 


भारतातल्या मुस्लिमात असलेल्या जातिप्रथेचे, विषमतेचे, मुलतत्व वादाचे जनकत्व दरवेळी हिंदु धर्माकडे दिले तर बौद्धिक वावदुकीत जिंकता येईल अशी भाबडी आशा  सेक्युलर मनात वसते आहे . त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य याच भाबड्या आशेवर जगायला आमची ना नाही . पण बहुसांस्कृतिक वाद , सर्व धर्म समाभाव , अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे आधुनिक बुरखे पांघरुन तथाकथित सेक्युलरांनि इस्लाम धर्म रक्षणाचि बांग ठोकल्याने त्यांची चिकित्सा क्रमप्राप्त ठरली आहे .




सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते.


सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते. हीच मुळात भयंकर गोची आहे . धर्म हि एक कालबाह्य आणि घातक गोष्ट आहे . हिंदुधर्म घातक आहे . तो मुख्यत: आत्मघातक आहे . सती प्रथेपासुन अस्प्रुश्यते पर्यंत सारा हिंदु धर्म आत्म घातक आहे . त्यामुळे हिंदु समाजाच्या भल्यासाठी त्याला धर्म मुक्त करणे आणि हिंदु धर्माची कठोर चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते . इस्लामची केस वेगळी आहे . बुरखा तलाक मुळे तो आत्म् घातक तर आहेच . पण दार उल इस्लाम - जिहाद - मुजाहिदीन अशा धार्मिक संकल्पनामुळे इस्लाम पर घातक हि आहे .


इस्लाम इतर  धर्म घातक असल्याने  इस्लामेतरांनाहि इस्लामची चिकित्सा करण्याचा नैतिक अधिकार आहे . पिके सिनेमातला हास्यास्पद शंकर योग्य आणि मुहम्मदाचे फ्रेंच कार्टुन अयोग्य हा कोणता उफराटा बुद्धिवाद ? इस्लामची चिकित्सा करण्याची परंपरा भारतीय बुद्धीवाद्यात आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर , कुरुंदकर , शहा , दलवाई या आधुनिक विचारवंतानि इस्लामची कठोर चिकित्सा केलेली दिसते . सध्या हि परंपरा खंडित झालेली दिसते . 

बहुसांस्कृतिक वाद आणि परधर्म सहिष्णुतेचे गोंडस बुरखे घेऊन कधी कन्हैय्या कंपूची तरफदारी कधी चार्ली हेब्दोचा विरोध भारतीय बुद्धिमंतानि चालवलेला दिसतो . व्यंगचित्र ते पण इस्लामच्या प्रेषिताच … काश्मीर चे वास्तव कधी तुम्ही समजून घेतले आहे काय ?

------------------------------------
तुमच्या मानवता वादि मागणी नुसार तिथे सार्वमत घेतले तर ? परिणाम काय होतील ?

भारत कश्मीरात सार्वमत का घेत नाही ? या प्रश्नाचे उत्तर त्याला या सार्वमताचा निकाल काय लागेल ?हे आधीच माहिती आहे यात दडलेले आहे ..सार्वमताचा निकाल तिथे काय लागेल? त्यातून पुढे काय होऊ शकते? त्याचे उर्वरित भारतावर काय परिणाम होतील? याचे योग्य आकलन नेहरु व तत्कालीन नेते यांना झाल्यामुळे त्यांनी ते घेण्यास नेहमीच टाळाटाळ केलेली आहे ..

भारतातील उर्वरित मुस्लीमांच्या हितासाठी शेख अब्दुलांने सार्वमताची मागणी सोडून द्यावी असा निरोपही नेहरुंनी एका सैन्यअधिकार्यामार्फत अब्दुला यांच्या कडे पाठवला होता ..कारण असे सार्वमत झालेच तर जम्मू मधील हिंदू,लडाख मधील बौद्ध तर भारताच्या बाजूने कौल देतील पण घाटीतील मुस्लीम हे पाकिस्तानकडे जाण्याचा कौल देतील..हे त्यांना कळत होते..अशा परिस्थितीत सार्वमत जर फुटीरवादी व पाकिस्तानवाद्यांनी जिंकले तर त्याचे परिणाम उर्वरित भारतातील मुस्लीम लोकांना भोगावे लागतील याची राजकीय दृष्टिकोनातून जागरुक असलेल्या कुणासही सहज कल्पना येईल...

एका फाळणीनंतरच त्यांच्या देशप्रेमाविषयी आजही शंका घेतली जाते..तिथे कश्मीरात अजून हेच घडल्यानंतर काय होईल? याची कल्पनाही करवत नाही ...भारतात आराजक माजेल..त्यापासून कुणीही वाचनार नाहीत ..त्यामुळे देशाच्या एका छोट्याशा भागातील आराजक मानवतावाद मिरविण्यासाठी सर्व भारतात पसरविणे शहाणपणाचे व देशहिताचेही नाही ... (शिवराज दत्तगोन्डे)
------------------------------------------------

जमाते इस्लामीशी सुसंगत भूमिका घेणार्या सेक्युलरांना आपण का हरतो आहोत हे समजणार नाहीच ! अल्लाहनेच त्यांच्या बुद्धीवर सील ठोकले आहे !


 

२ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *